Tuesday, December 29, 2009

‘तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत’-प्रदीप सोळुंके
बीड, ५ नोव्हेंबर 2009
जन्मत: कोणीही मोठा नसतो तर प्रत्येकजण स्वत:च्या कर्तबगारीनेच मोठा होतो. त्यामुळे तरुणांनी स्वप्न मोठे पाहावेत, असे आवाहन प्रा. प्रदीप सोळुंके यांनी केले.बीड शहरातील तिसरे सकळ मराठा महासंमेलनात ‘तरुणांनो जागे व्हा’ या विषयावर प्रा. सोळुंके यांचे व्याख्यान झाले. यावेळी संयोजक अर्जुनराव जाहेर पाटील उपस्थित होते.प्रा. सोळुंके म्हणाले, तरुणांनी प्रयत्नवादी व्हावे. इच्छित ध्येय गाठण्यासाठी नेटाने प्रयत्न करायला हवेत. बदलत्या काळानुसार नवीन बदलांना स्वीकारले पाहिजे. जो काळानुसार बदलतो तोच टिकून राहतो, असे सांगताना तरुणांनी व्यवसायात कमीपणा न मानता करावा. शेतीबरोबर जोडधंदा केला तर प्रगती होईल. यासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. पालकांनीही संपत्तीवर लक्ष देण्याऐवजी संततीवर लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ह.भ.प. आत्माराम जाधव यांनी ‘परिवर्तन चळवळीत संतांचे योगदान’ या विषयावर विचार मांडले.

No comments:

Post a Comment